बोरगाव । प्रतिनिधी :- आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नवजात बालकांचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जामुनपाडा येथील रहिवासी मीना सुनील चौधरी हिला शनिवारी रात्री दहा वाजता प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉ. राकेश सोनवणे यांनी दोन तास उपचारा नंतर पुढील उपचारासाठी सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकाव्दारे हलविण्यासाठी सांगितले असता पाच किलोमीटर अंतरावर वाहनातच महिलेची प्रसूती झाली. 108 वाहनांमध्ये डॉक्टर नसल्याने नवजात बाळावर उपचार झाले नसल्याने बाळ दगावले आहे. यावेळी रुग्णवाहिका वाहनात फक्त नवीन आलेल्या दोन नर्स असल्याने यावेळी उपचार होऊ शकले नाहीत. यासर्व कारणास कारणीभूत म्हणून उंबरठाण येथील डॉ.राकेश सोनवणे जबाबदार आहेत. तरी संबंधित विभागाने तातडीने दखल डॉक्टर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नवजात बालकांची माता मीना चौधरी हिने केली आहे.