सरण ही थकले मरण पाहुणी..
मरणानंतरही भोगाव्या लागतात नरक यातना.. या काही एखाद्या कवितेतील भावार्थ स्पष्ट करणा-या ओळी नसून प्रत्यक्ष सुरगाणा तालुक्यातील रोंघाने ग्रामपंचायत मधील जांभूळपाडा (दा.)येथे स्मशानभूमी अभावी उघड्यावरति दफनविधी करावा लागतो आहे.जांभूळपाडा (दा.) येथे एक वयोवृद्धाचे आक्समिक निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात अद्यापही स्मशानभूमी शेडच नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी पावसाळ्यात ग्रामस्थांना सरण रचतांना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. कसे बसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी द्या याचा कशा अशा प्रश्न नागरिकांना पडतो, कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात. पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागतात. काही जागरूक ग्रामस्थांनी सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेली स्मशानभूमीत स्वच्छता,आसन व्यवस्था, प्रसाधन गृह,वृक्षारोपण, दिवे, पावसाचे साठवलेले पाणी अशा सुख सोयी उपलब्ध केलेल्या आहेत.
तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी अजून ही स्मशानभूमी करीता प्रतिक्षा करावी लागतेय हे न उलगडणारे कोडे आहे. आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र जांभूळपाडा (दा.) गावात स्मशानभूमी पर्यंत रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते, तर काही ठिकाणी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून घ्यावे लागतात. शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. रोंघाने ग्रामपंचायतीत 7 महसुली गावे तर 3 पाडे समाविष्ट असून रोंघाने, जांभूळपाडा (दा.), बर्डा, सांबरखलं, बिजूरपाडा, म्हैसमाळ, गळवड, शिरीषपाडा, मोरडा, कासटबारी, यापैकी बहुतेक गावात अजून
या गावात स्मशानभूमी शेड उभारले नाही. अजूनही उघड्यावर अंत्यसंस्कार केले जातात,
त्यामुळे 90% गावात विना स्मशानभूमी विरहित एकमेव तालुक्यातील ग्रामपंचायत तर नाही ना असे म्हणण्याची वेळ आली आहे.