maharashtratribalnews

चिराई घाटात भीषण अपघात: तीन ठार, एक गंभीर जखमी

सुरगाणा l प्रतिनिधी :-  सुरगाणा तालुक्यातील चिराई घाटात मंगळवारी (दि.३) रोजी दुपारी तीन वाजता (एमएच १५ एचई १२९९) व (एम एच १५ एचडी ७१०३) या दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. अपघातात भास्कर मोरे (२२, रा. पंगारबारी, ता. सुरगाणा), मोहन लक्ष्मण पवार (रा. देवलदरी, ता. सुरगाणा) व रोहिदास सुभाष गवळी (रा. दरेगाव (ह) ता. कळवण) हे ठार झाले आहे.
    या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, दिनेश मोढें (रा. पंगारबारी, ता. सुरगाणा) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीस तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
     सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे मोहन पवार हे सुरगाणा कडून बोरगाव कडे येत असताना तर भास्कर मोरे हे आपल्या गावाकडे जात असताना हा अपघात झाला आहे. अपघात एवढा जोरदार होता की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला. स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतकार्य करत जखमी ला १०८ वाहनात टाकण्यासाठी मदत केली.
     अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अतिवेग आणि घाटातील वळणदार रस्ता हे कारणीभूत असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
     या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने