maharashtratribalnews

पाणी टंचाई विरोधात महिलांचा मोर्चा वडाळा हतगड येथील महिला आक्रमक

कळवण । प्रतिनिधी:-कळवण तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील वडाळा हतगड गावातील महिलांनी गावात भीषण पाणीटंचाई होत असल्याने कळवण पंचायत समितीवर पायी मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडले. 
      गेल्या अनेक दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गावातील सर्व महिलांनी एकत्र येत घोषणा देत वडाळा (हतगड) येथून आपला मोर्चा कळवणच्या मध्यवर्ती शासकीय कार्यालयाच्या दिशेने सुरू केला. हातात पाट्या, घागर्‍या व रिकामे हंडे घेत महिलांनी पंचायत समितीच्या अधिकार्‍यांना घेराव घालून आपल्या व्यथा ऐकविल्या. त्यांनी प्रशासनाला सांगितले की, वारंवार तक्रारी करूनही अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. मोर्चाच्या नेतृत्वात गावातील महिला नेत्या, स्वयंसहायता गटाच्या सदस्या, शेतमजुर महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांनी पंचायत समिती अधिकार्‍यांकडे लेखी निवेदन सादर करत पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी केली. पंचायत समितीचे अधिकारी यांनी महिला मोर्चेकरांच्या समस्या जाणून घेत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे. कळवण तालुक्यातील अनेक गावात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई भासत असल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. े डोंगर, तसेच जंगलांत सध्या बिबट्यांंचे दहशत जास्त असल्याने महिलांना आपला जीव मुठीत घेवून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे त्वरीत शासनाने यंाबाबत उपाययोजना करुन पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने