बाऱ्हे l दिपक देशमुख
सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत रोंघाने पैकी, जांभूळपाडा गावातील नागरिकांना अजूनही स्मशानभूमी व रस्त्या अभावी उघड्यावर दफनविधी करावी लागत आहे.येथील नागरिकांनी वेळोवेळी स्मशानभूमी व स्मशानभूमीच्या रस्त्याची मागणी करूनही,अद्यापपर्यंत याकडे शासन किंवा लोकप्रतिनिधींनी कोणीही लक्ष दिलेले नाही.त्यामुळे ऐन पावसाळ्यात मौत झाली तर उघड्यावर दफनविधी करावी लागत आहे.जांभुळपाडा येथील उपसरपंच, श्रीम.जयवंती वार्डे व ग्रा.प.सदस्य श्री.मुरलीधर घांगळे सह ग्रामस्थ ज्ञानेश्र्वर वार्डे,एकनाथ घांगळे,वामन भोये,नामदेव हाडस,युवराज जाधव, नंदू भोये आदि नागरिकांनी स्मशानभूमी शेड व रस्त्या साठी लोकप्रतिनिधी आणि शासनाकडे मागणी केली आहे.