maharashtratribalnews

चिमुकल्या च्या मोर्चात धावून आले खासदार भास्कर भगरे

कळवण l वैभव गायकवाड:- कळवण प्रकल्पातील स्वामी विवेकानंद एक्सलंट स्कुल अजंग इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने वारंवार प्रकल्पात तक्रारी करुनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने कळवण प्रकल्पापासून नाशिक आयुक्त कार्यालय पाणी पावसात भिजत पायी मोर्चा काढण्यात आला होता. गेल्या 4 वर्षांपासून या शाळेत शिक्षणाची सुविधा, तसेच जेवन,पाणी टंचाई असे अनेक भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने आम्हाला शाळा बदलुन पाहिजे या मागणी करत असताना विद्यार्थी व पालकांचे अधिकारी ऐकून घेत नसल्याने विद्यार्थी व पालक यांनी पायी मोर्चा नाशिक आदिवासी आयुक्त कार्यालयाकडे जात असताना, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांना माहिती लागतास ते चिमुकल्यांन साठी आले धावुन. खासदार भगरे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना समजतं काढून आदिवासी विकास अप्पर आयुक्त नाशिक यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता विद्यार्थी व पालकांना दुसऱ्या दिवशी आयुक्त कार्यालय येथे मिंटीग घेऊन अडचणी सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले.जर अडचणी सोडविण्यात प्रशासनाला जमले नाही तर मी व विद्यार्थी आयुक्त कार्यालयावरचं उपोषण करु असे सांगितले.
      तसेच प्रकल्प अधिकारी अनुकुरी नरेश यांनी सांगितले की एक कमेटी नेमुन शाळेची चौकशी केली जाईल आणि शाळेवर कार्यवाही केली जाईल असे पालकांना आश्वासन दिले.यावेळी काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष शितल ताई महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, आदिवासी संघटना,रवी बहिरम ज्ञानेश्वर राऊत,सुदाम भोये, विशाल गांगुर्डे आदि उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने