चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने अनेक गावात विज पुरवठा खंडित झाला होता. ग्रामस्थांना रात्री १०-१२ तास अंधाराचा सामना करावा लागला. संततधार पावसामुळे विज पुरवठ्याचा लपंडाव चालू आहे. त्याच बरोबर खरीप हंगामात पेरलेली चांगल्या दर्जाचे बी बियाणे संततधार पावसामुळे कुजले काही बी बियाणे वाहत्या पाण्यात वाहून गेले. शेतकऱ्यांना भात लागवड दरम्यान भात रोपांची तुटवडा भासणार असल्याचे दिसून आले आहे.
संततधार पावसामुळे काथवडपाडा येथील टेकडीचा भागावरील दगड माती कोसळल्याने देवजी सावजी दाहवाड याच्या पक्क्या घराची भिंत फोडून घरात दगड माती साचली आहे. घर प्रमुखांच्या सततर्कमुळे जिवीत हानी टळली. या घटनेची माहिती मिळताच तलाठी कार्यालयातील कर्मचारी कविता चौधरी यांनी घटनास्थळी भेट देवून ग्रामस्थांच्या समवेत घराचा पंचनामा केला. तसेच ग्रामस्थांना सततर्क राहण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वामन सापटे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
काथवडपाडा येथील देवजी दाहवाड याच्या घराची झालेली नुकसान.