maharashtratribalnews

अक्राळे - नाशिक एअरपोर्ट रस्ता दुरुस्त करा रिपाइंचे सागर गायकवाड यांची मागणी

दिंडोरी । दि. मनोज पाटील:- दिंडोरी तालुक्यातील अक्राळे फाटा ते नाशिक एअरपोर्ट रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली असून चार महिन्यापुर्वी डागडूजी केली होती. ती फक्त वरच्या वर डागडूजी केल्याने आता पुर्णपणे रस्ता उखडला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून त्वरीत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी रिपाइं युवक जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड यांनी केली आहे. 
      अक्राळे फाटा ते नाशिक एअरपोर्ट रस्त्याचे गेल्या चार महिन्यापुर्वी अर्धवटच डागडूजी केली होती. त्यामुळे तीही पुर्णपणे उखडून गेल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. हा रस्ता ओझर महामार्गाला जोडणारा असल्याने अक्राळे, आंबेदिंडोरी, जऊळके, शिवनई, वरवंडी, गणेशगाव आदी परिसरातील या रस्त्याचा वापर करीत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक छोटे - मोठे अपघात होत असतात. अनेकांना ्रअपंगत्व आले आहे. तसेच खराब रस्त्यामुळे वाहनचालकांना तसेच प्रवाशी वर्गांना शारिरीक आजारांना सामोरे जावे लागत आहे. वाहनांचे पाटे तुटणे, पंक्चर होणे, पलटी होणे आदी संकटांचा सामना वाहनचालकांना तोंड द्यावे लागत आहे. परिसरातील शेतकर्‍यांना आपला शेतीमाल याच रस्त्यावरुन घेवून जावा लागत आहे. या खराब रस्त्यामुळे भाजीपाल्याचे नुकसान होतेच परंतू वाहने वेळेत बाजारपेठेत पोहचत नसल्याने त्यांचाही फटका शेतकर्‍यांना बसतो. उशिरा माल पोहचल्यावर व्यापारी वर्ग त्या शेती मालाला विचारत सुध्दा नाही. नाईलाजाने शेतकर्‍यांना तो भाजीपाला परत माघारी घेवून यावे लागते. तसेच माल खराबही झाल्यावर तो फेकून द्यावा लागतो. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून त्वरीत या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी रिपाइं युवक जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने