दिंडोरी । मनोज पाटील
सध्या अनेक फायनान्स कंपन्या ऑनलाईन कर्ज वाटप करतांना दिसून येत आहे. हे कंपन्या नागरिकांना फोन करुन विनाकारण त्रास देत आहे. तरी याबाबत संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून त्वरीत या बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
सध्या अनेक फायनान्स कंपन्या ऑनलाईन कर्ज वाटप करतांना दिसून येत आहे. त्यासाठी कमी कागदपत्र लागत असल्याने अनेक गरजू व्यक्ती हे कर्ज घेतात. परंतु ज्यावेळी वसुली करण्याची वेळ येते, तेव्हा हे लोक त्या गावातील लोकांचे नंबर मिळवून त्यांना अत्यंत वाईट शब्दात बोलतात. लोकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो. अशा अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. अनेक लोकांना विनाकारण फोन येत असल्याचे समोर येत आहे. ओटीपी देखील अनेक मोबाईल वर येत आहे. अशा वेळी ींीरपीरलींळेप झाल्यास लोकांनी 1945 वर कॉल करण्यात यावा. तसेच विनाकारण त्रास देणार्या फोन विरुद्ध संचार साथी ह्या सरकारी वेब साईटवर तक्रारी नोंदवाव्या, असे सायबर सेल कडून निर्देश देण्यात आले आहे. फायनान्स कंपनीच्या कॉलने नागरिक त्रस्त झाले आहे. नागरिक वाहने चालवित असतांना अचानक त्यांचा फोन येत असतात. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तरी याबाबत संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून त्वरीत या बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी विकास संघटनेचे अध्यक्ष नितीन बोढारे, अॅड. प्रवीण देशमुख, अतिश शार्दुल, शिवा शार्दुल, स्वप्निल देशमुख आदींनी केली आहे.