सुरगाणा l प्रतिनिधी
चूकून त्यांनी मला आदिवासी विकास मंत्री सांगितले. ! पण होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे. मात्र आदिवासी आहे हे निश्चित. आपल्या मुळे हि मंत्री पदाची संधी मिळाली असून या संधीचे सोने केल्या शिवाय राहणार नाही.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी डांग जिल्हा गुजरात सिमेलगत खुंटविहीर येथे श्री सत्य साई सेवा समिती कडोली, मरोली विभाग नवसारी गुजरात राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १०८ वधू वरांना आशीर्वाद देत प्रसंगी केले. या विवाह सोहळ्या प्रसंगी कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार आमदार नितीन पवार, साक्री विधानसभेच्या आमदार मंजुळा गावित,आदिवासी सेवक चिंतामण गावित, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिका राऊत, गोपाळ धुम, समीर चव्हाण, भिका राठोड, सरपंच आनंदा झिरवाळ, तुळशीराम महाले,पांडुरंग वाघमारे, नवसू गायकवाड, रामदास केंगा, रामदास गवळी,
सत्य साई सेवा समितीचे हसमुखभाई मिस्त्री, हंसाबेन मिस्त्री, शैलेशभाई पटेल, राजुभाई शाह, मोहिनीबेन वाणी,
एन.डी.गावित, तहसिलदार रामजी राठोड, पोलीस निरीक्षक राहुल मोरे आदी उपस्थित होते. यावेळी झिरवाळ यांनी सांगितले की, अन्न हे औषध म्हणून खायचे आहे. नाहीतर औषध अन्ना सारखे खावे लागेल. चिली सारखा अन्न पदार्थ आरोग्यस अतिशय घातक आहे.चायनीज पदार्थ पेक्षा कुळथाचे बेसन, उडदाचा भुजा खा. निरोगी रहाल.
जून्या रीतीरिवाजांप्रमाणे लग्न केले पाहिजे. डीजे, कपड्यांचा आहेर हा खर्च टाळायला पाहिजे. अंगावरची हळद उतरत नाही तोच लग्नाचे पैसे फेडायला देशावर कामाला. जी वधू वरांची फुलांनी सजवलेली, एसी असलेली भाड्यानं आणलेल्या गाडीत दुसऱ्याच दिवशी गोण्या अन सरपणासाठी लाकडी भरून बागावर कामाला. हे आता बदलल पाहिजे. कष्टाच्या पैशाची किमंत जाणून जोपासना करायला हवी. तो कष्टाने कमावलेला घामाचा पैसा सत्कारणी लावून मुलांचे शिक्षण, आरोग्य यावर खर्च करा. महागाईच्या काळात देशावर च्या मंडळींनी लग्नात अमाप पैसा खर्च करणे हे नादाला लावले.तेच आता सुपारीत लग्न होतात. वेळ, पैसा, डीजे हा खर्च वाया घालवू नका.रस्त्याने जाता येता अपघात होतात, हात पाय मोडतात,भांडण तंटे, वाद विवाद झाल्यावर पोलीस ठाण्यात चकरा मारायच्या हे आता टाळले पाहिजे. असा सल्ला त्यांनी दिला.
सामुदायिक विवाह हि आज काळजी गरज बनली असून जेष्ठ दिवगंत कार्यकर्ते हरिभाऊ महाले यांनी ४० वर्षापूर्वी काळाची गरज ओळखून सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली होती.समाजात कपड्यांचा आहेर या अनिष्ट प्रथेवर बंदी घालणे आवश्यक असून नवरीच्या वजनापेक्षा कपड्यांचा आहेर जास्त अशी अवस्था झाली आहे. हा हकनाक खर्च टाळायला हवा. आहेर म्हणून लग्नात भेट दिलेली साडीची घडी न विस्कटता चार साड्यांच्या बदल्यात तोडून, मोडून जोडलेली प्लास्टिक भांडी घेतली जातात. हे आता बदलले पाहिजे. यावेळी जिथे पिण्यास पाणी मिळत नाही तिथे दुध विकले जाते. दूध विक्रीतून पंचवीस लाख दरमहा उत्पन्न खुंटविहीर येथे घेतले जाते. हि किमया खुंटविहीरचे सरपंच आनंदा झिरवाळ यांनी करून दाखवली याबाबत कौतुक केले. या सोहळ्यात परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीते करीता खुंटविहीर, मालगोंदा, गोणदगड, उदालदरी, उंबरघोडा, मोहपाडा, गाळबारी, पिंपळसोंड, उंबरपाडा, झारणीपाडा, रानविहीर आदि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.