maharashtratribalnews

भेनशेत पाणी योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न . निरपण,हंडा हंडी ९०० मीटर जलपरिषद अभियान पाणी योजना शुभारंभ भेनशेत

बा-हे वार्ताहर l नामदेव पाडवी 
 सुरगाणा तालुक्यातील अति पाणी टंचाई ग्रस्त गाव भेनशेत मार्च महिना सुरवात होताच भेनशेत गावाला पाणी समस्या भेडसावत असायची याबाबतीत गावातील ग्रामस्थ यांना पडलेला गहन प्रश्न जल जिवन योजना येईल आणि गावाला पाणी मिळेल या आशेवर गावकरी होते. परंतु गावात फक्त रिकामी टाकी बांधकाम करुन रिकामी टाकी दिमाखात उभी आहे. परंतु गावाला योजना नाही. म्हणून गावाने एकत्र येत जलपरिषद माध्यमातून पाणी समस्या मिटवावी म्हणून प्रयत्न सुरु केले. खिर्डी ग्रामपंचायत सरपंच शिवराम वळवी, ग्रामविकास अधिकारी गिरिधर भरसट यांनी गावाला एकत्र करीत जलपरिषद कडे पाठपुरावा सुरु केला यावेळी जलपरिषद मित्र परिवार अध्यक्ष देविदास कामडी यांनी इतर वापर पाणी प्रकल्प भेनशेत आर्थिक व तांत्रिक सहकार्याने ग्रामीण पुढाकार ग्रुप, आयआयटी बॉम्बे माजी विद्यार्थी संघटना, व्ही .जे .टी .आय. (वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी संस्था) यांच्या माध्यमातून ऑनलाईन सर्व्हे करुन साईट व्हिजिट केल्या गावात आदर्श स्वयंसहाय्यता बचतगट भेनशेत नावाने स्थापना करुन या योजनेची श्रमदान करण्याची जबाबदारी गावावर सोपवली यासाठी आर्थिक व तांत्रिक बाब ग्रामीण पुढाकार ग्रुप, आयआयटी बॉम्बे माजी विद्यार्थी संघटना व्ही जे या संस्थानी जबाबदारी घेतली ग्रामीण पुढाकार ग्रुप,आय. आय .टि .बॉम्बे माजी विद्यार्थी संघटना व्हीं .जे .टी .आय. योगेश कर्णिक, इंजि. दिपक गुप्ते, इंजि. प्रसाद बोडस, प्रा. बोडस, प्रा. प्रवीण चौधरी, डॉ. केशव सांगळे, अशोक कलबाग, महाजन यांनी सांभाळली.
      भेनशेत इतर पाणी वापर योजनेची सुरवात ४ जून २०२४ रोजी मोजमाप करुन ऑगस्ट ला सोलर फिटिंग करण्यात आले. भेनशेत गावाने लोकार्पण सोहळा आयोजित करुन योगेश कर्णिक यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष वि जे टी आय चे डॉ. केशव सांगळे यांच्या जागी प्रा. प्रवीण चौधरी 
  प्रमुख अतिथी आय आय टी बॉंबे इंजि प्रसाद बोडस, वि.जे.टी.आय. विध्यार्थी उपस्थिती होते. प्रमुख पाहुणे बाऱ्हे वनपरीक्षेत्र अधिकारी सुधीर कवर साहेब, जलसंधारण अधिकारी ल.पा. कळवण नंदराज धुम, वेल्स ऑन विल्स व आयडियाजाम संस्थेचे नारायण गभाले, ऋणानुबंध फाऊंडेशन अध्यक्ष दुर्वादास गायकवाड, प्रगशील शेतकरी यशवंत गावंडे, खिर्डी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी गिरीधर भरसट, सरपंच शिवराम वळवी, माजी सरपंच दत्ता निकुळे, बाऱ्हे वनविभाग परीक्षेत्रातील सर्व वनविभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थिती होते. जलपरिषद मित्र परिवार शरद पवार, नामदेव पाडवी, हंसराज भोये, प्रकाश गांगुर्डे, शांताराम महाले, जलपरिषद प्लंबर भगवान पाडवी, भरत पाडवी, मधुकर पाडवी, छाया चित्रकार राजेश गायकवाड, अमित गावंडे, रोशन भांगरे, कौस्तुभ दोंदे उपस्थित होते. आदर्श स्वयं सहाय्यताबचत गट चिऱ्याचा पाडा, चिंचपाडा अध्यक्ष कृष्णा चव्हाण, निवृत्ती बारे, एकनाथ गांगोडे उपस्थित होते. 
       भेनशेत लोकार्पण सोहळ्यानिमित्त जलदूत व वनसंवर्धन करनारे पाहूणे यांचा जलपरिषद मित्र परिवार पत्रकार यांच्या तर्फे स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन अधिकारी याच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आयोजन म्हणून
आदर्श स्वयंसहाय्यता बचत गट भेनशेत व भेनशेत ग्रामस्थ संतोष खुरकुटे, काही धनगर, पंडित पवार, रमेश वड, वसंत पवार, विलास पागी, प्रभाकर गोंड, रामदास खुरकुटे, हिरामण पवार, मधुकर बारे, गोविंदा माडे, लक्ष्मण वड सर्व ग्रामस्थ महिला यांनी कार्यक्रम आयोजित करुन पाहुण्यांचे आदिवासी पारंपरिक वाद्य तूर, पावरी, संबळ वाजवून नृत्य करीत मिरवणूक काढण्यात आली. गावात पाणी आल्याने महिलां आनंदी होत्या.
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास कामडी यांनी केले. वक्ते नारायण गभाले यांनी सांभाळून आभार दुर्वादास गायकवाड यांनी मानले. कार्यकामाची सांगता करुन जलपरिषद मित्र बेडसे येथील हेमराज अलबाड यांचा वाढदिवस साजरा करुन भेनशेत गावातील विद्यार्थी यांना कपडे वाटप करुन हेमराज अलबाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व पाहुण्यांनी हेमराज ला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया:-
माझं लग्न झाल्यापासून पाण्याचा हंडा घेऊन वणवण फिरावे लागत होते. माझी सासू व गावातील बायांना विहीरिला पाणी कमी झाल्यावर खोल दरी जाऊन पाणी डोक्यावर पाणी आणावे लागत होते ते हाल सामाजिक संस्था यांनी कायमचेच दूर केल्याने महिलांचा त्रास कमी झाल्याने खूप आनंद झाला आहे
-: छाया पवार, मंगला खुरकुटे भेनशेत

चौकट
प्रतिक्रिया:- सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम उंचसखल डोंगरदऱ्यात असलेले भेनशेत गावात पाणी टंचाई ही गावातील ग्रामस्थांच्या पाचवीलाच पुजलेली होती. त्यामुळे सामाजिक संस्था आणि जलपरिषद मित्र परिवार आणि ग्रामस्थ यांच्या त्रिवेणी संगनमताने एकत्र येत हे गाव आता पाणी टंचाई मुक्त झाले आहे. आमचे गाव उंच डोंगरावर असल्यामुळे या गावात वर्षानुवर्षं आम्हाला जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. गावात आता नळाला पाणी आल्यामुळे आमच्या डोक्यावरचा हंड्याचा भार आणि होणारा त्रास कमी झाला आहे. ग्रामीण पुढाकार ग्रुप आय आय टी बॉम्बे माजी विद्यार्थी संघटना, जलपरिषद मित्र परिवार आणि वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी यांचे भेनशेत ग्रामस्थांच्यावतीने खूप - खूप आभार. 
  -: मोहना वड, स्थानिक रहिवासी भेनशेत

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने