दिंडोरी । प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथे बीएसएनएल मोबाईलचा टॉवरच उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांसह लहान मोठ्यांची मोठी कुचंबना होत आहे. त्यामुळे मोबाईलची सुविधा विस्कळित झाल्याने नागरिकांचा उद्रेक वाढला आहे.
वरवंडी गाव नाशिक शहरापासून सात किलोमीटर अंतरावर आहे. दिंडोरी तालुक्यात जरी असले हे गाव परंतु दळणवळणाचा नेहमीच भाग हा शहराशी जोडलेला आहे. शहराचा भाग असताना सुद्धा या गावात मोबाईलचा टॉवरच उपलब्ध नाही. गेल्या आठ ते दहा वर्षांपूर्वी येथे बीएसएनएलचा टॉवर उपलब्ध झाला आहे, परंतु त्याकडे बीएसएनएलचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. येथील ग्रामस्थ, तरुण, महिला यांना याचा कोणताही फायदा होत नाही. याच भागात पुणे विद्यापीठाची शाखा आहे. महावीर कॉलेज पॉलीटेक्निक सुद्धा उपलब्ध आहे. असे असताना या भागात मोबाईलचा कोणताही फायदा होत नाही. मग शेतकरी असो किंवा व्यावसायिक असो यांना कोणताही यामुळे शहराशी संपर्क साधता येत नाही. येथील पूर्णपणे कष्टकरी शेतकरी असून प्रमुख्याने डाळिंब द्राक्ष आणि कांदा हे प्रमुख पीक आहे. परंतु याची विक्री करताना कोणता शेतकरी एकमेकांशी संवाद साधू शकत नाही. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचण येत असल्याने या भागात तात्काळ न्याय देऊन वरवंडी गावास एक प्रकारे मोबाईलला उर्जित अवस्था नेण्यासाठी सहकार्य करावे. तसेच मंत्री ना. नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
वरवंडी हे गाव खरोखर नाशिक शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे कसे पाहता नगरपालिका हद्द फक्त दोन किलोमीटरवर आहे. या गावाकडे जाणून दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होत आहे. कष्टकरी शेतकरी असून सुद्धा नागरिकांना एकमेकांशी संवाद साधता येत नाही आणि ती समस्या तात्काळ दूर करावी.
रामनाथ भिका जाधव, माजी सरपंच वरवंडी