maharashtratribalnews

गणपतबारी येथील त्र्यंबकेश्वर प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य.

देवडोंगरी l शंकर निंबारे :-दि.20 तालुका त्र्यंबकेश्वर शहराच्या जवळच हरसुल- जव्हार जाणाऱ्या रस्त्यावरील गणपतबारी येथील प्रवेशद्वार निसर्गरम्य परिसर ओळखला जातो या मार्गाने श्रावण महिन्यात तसेच वर्षभरातील विविध धार्मिक पार्वणीला महाराष्ट्र भरातून लाखो भाविक भक्त ब्रम्हगिरी प्रशिक्षणा (फेरी) मारण्यासाठी येत असतात तसेच या बारी मध्ये जागृत गणपतीचे मंदिर असून गणपतबारी जवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूने घाणकचरा, प्लास्टीक पिशव्या टाकल्या जातात यामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. या घाणीमुळे वेगवेगळे आजार हवेतुन प्रसार होऊ शकतात. वेळीच शासनाने घाणीचे व्यवस्थापन करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
     जव्हार - सेलवास - हरसुल ये जा करणाऱ्या प्रवाशांना तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात घाणीच्या दुर्गंधीचा वास सहन करावा लागतो. या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याकडे संबंधित विभागाच्या प्रशासनाने दुर्लक्ष न करता घाण कचरा फेकणाऱ्यांवरती योग्य कार्यवाही करावी तसेच साचलेल्या घाणीची विल्हेवाट व्यवस्थापन करावे. असे भारतीय जनता पक्षाचे आदिवासी आघाडी नाशिक जिल्हा चिटणीस जयवंत हागोटे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने