सुरगाणा l कृष्णा पवार:- सुरगाणा तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने थैमान घातले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः शेतकरी राजा यांच्या जनावरांसाठी साठवलेला चारा पूर्णपणे भिजून खराब झाला आहे.
शेतकरी राजाने हंगामासाठी मेहनतीने चारा साठवून ठेवला होता. परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे तो चारा भिजून नष्ट झाला. "सगळं स्वप्न उध्वस्त झालं. जनावरांसाठी साठवलेला चारा जपून ठेवला होता, पण पावसामुळे सर्व वाया गेलं," असे सांगताना शेतकरी राजा यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.